स्वातंत्र्य भास्कर

500.00

(Swatantrya Bhaskar)

(आपण 9850962807 या क्रमांकावर Gpayनेही पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. अश्या पद्धतीने सवलतमूल्य जमा केल्यास कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर whatsapp/sms करावा.)

‘स्वातंत्र्य भास्कर’ ही १८५७ सालातील ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यसंग्रामात उडी मारलेल्या नरगुंद नरेशांची कहाणी. भास्करराव यांचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजात ‘बाबासाहेब’ असाही केला जातो. ते भावे घराण्याचे एक नरमणी. १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी ते नरगुंदचे अधिपती होते. मरहट्टा असलेल्या या स्वातंत्र्यसेनानीविषयी सर्वसामान्य महाराष्ट्राला फार त्रोटक माहिती आहे. राज्यपद तारूण्यात येत असतानाच त्यावर ब्रिटिशांनी घाला घातला.

ही कहाणी लिहिताना लेखकाच्या वर्णनाची शैली अशी आहे की प्रत्येक प्रसंग चित्ररूपाने ‘फ्रेम टू फ्रेम’ म्हणता येईल अशा पद्धतीने डोळ्यासमोर उभा राहतो आणि पात्रांबरोबरच आपणही नरगुंदचा राजवाडा, व्यंकटेशाचे मंदिर, मलप्रभा नदीचा तीर, राने-वने, नेपाळचा प्रदेश येथे भटकतो. ही भटकंती करताना वसई आणि भायखळ्यालाही येऊन पोहोचतो. या भास्कराच्या तेजाचा परिचय करून दिल्याबद्दल श्री. अरविंद हेब्बार यांचे शतशः धन्यवाद!

– डॉ. मधुमंजिरी गटणे.

Description

मूळ लेखक: श्री. बसवराज नाय्कर
अनुवाद: श्री. अरविंद हेब्बार

हे भारतवर्ष एकेकाळी आसेतुहिमाचल पसरलेले होते. अत्यंत समृद्ध नैसर्गिक संपत्ती, मानवनिर्मित वस्तू, कपडे, कलाकृती या सार्‍या वैभवाने परिपूर्ण असा हा देश होता. इथे निर्मिलेल्या होड्या व जहाज आदींना पाश्चिमात्य देशात मोठी मागणी होती. नालंदासारखी जगद्विख्यात विश्‍वविद्यालये येथे होती. या काळात भारत जगभरातल्या अनेक देशात व्यापार करून अपार संपन्न देश बनला. परंतु कालांतराने हीच संपत्ती या देशासाठी घातक ठरू लागली. एकेकजण भारतावर स्वारी करून लुटू लागले. व्यापाराच्या निमित्ताने ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले. इथल्या छोट्या-छोट्या संस्थानिकांचे आपसातील वैर, हेवेदावे त्यांनी सूक्ष्मपणे हेरले आणि एकाला साथ देऊन दुसऱ्याचे संस्थान आपल्या ताब्यात घेऊ लागले. ब्रिटीशांची ही मोहीम दक्षिण हिंदुस्थानात सुरू होऊन पुढे साऱ्या देशभर पसरली आणि कंपनी सरकार उदयास आले.

अठराव्या शतकाचा प्रारंभ झाला आणि ब्रिटिशांनी चालवलेल्या कुटिल कारस्थानांविरुद्ध असंतोष वाढू लागला. कंपनी सरकारने दत्तकविरोधी कायदा लागू करून नरगुंद संस्थान आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता नरगुंद नरेश श्री. भास्करराव भावे यांनी ब्रिटिशांविरुद्ध जो लढा दिला त्याची ही कहाणी!
*

You may also like…